नोट:- या गजलेतील पहिली ओळ गजलकार सुरेश भटांच्या गजलेच्या मतल्याची पहिली ओळ आहे
ऍन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
भोगल्या लाखो व्यथांचा चेहरा तसवीर होता
प्रेम गाणे गावयाचे वय तयाचे पण तरीही
शख्स तो मशिदीत गेला सांगण्या तकरीर होता
कष्ट केल्याविन कधी का भाग्य खुलते माणसाचे ?
ना कुणी आला जगी या घेउनी तकदीर होता
धुंद जगणे अन् बिघडणे शाप हा नवख्या पिढीला
स्पष्ट माझा तो इशारा वाटला किरकीर होता
मी विदर्भाला निघालो तीर्थ पावन क्षेत्र बघण्या
चालवी "आनंद वन" जो तोच हाजी पीर होता
विश्व सारे हिंडल्यावर उमगले मजला असे की
खान होता सर्व साक्षी तर कुठे जसबीर होता
सभ्य तो रुद्राक्षधारी रात्र मयखान्यात काढी
त्या पुजा-याचा ठिकाना गावचे मंदीर होता
पाक देशी राज्य आहे पक्षपाती कायद्यांचे
ज्यास छळले त्रासले तो एक मोहाजीर होता
शोध घे "निशिकांत" आता मर्द कणखर चेह-यांचा
मर्द कसले ! मारलेला तो नथीतुन तीर होता
निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo,com
प्रतिसादाची प्रतिक्षा
No comments:
Post a Comment