वादळ आले नवपक्षाचे, जरा आठवा
आधी होते एक घराणे, देश नागवा
सावरकरच्या नावाचीही हकालपट्टी
नकोच होता इतरांचा कोठेच गवगवा
झाला नव्हता राम म्हणे या धरतीवरती
कसे पचवले तू हे सारे! सांग राघवा
समूळ हटवावया गरीबी जमले नाही
म्हणून निर्णय नवा घेतला " गरीब हटवा"
मुरावयाचे तेव्हा पाणी जेथे तेथे
लोकांना घोषणा दिली की " पाणी जिरवा"
जनतेला दावली गाजरे, अन् नेत्यांनी
काळ्या पैशातून बनवला गाजर हलवा
उत्पीडन तर होतच असते सामान्यांचे!
मंत्र्यांनो! जे श्रेष्ठी म्हणते तेच राबवा
जरी लादली आणीबाणी देशावरती
हुकूम होता स्वतंत्र्याचे ढोल वाजवा
पुन्हा न यावी काळोखाची रजनी म्हणुनी
घरोघरी कार्यरत असावा एक काजवा
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment