कुणी आज नाही----तरही गझल--उला मिसरा गझलकार भूषण कटककर यांचा.
करोना बाधित झाल्यामुळे दवाखान्यात पंधरा दिवस होतो. परतल्यानंतर नकरात्मक मूडमधे लिहिलेली गझल
कुणी काल होते कुणी आज नाही
नियंत्या! दयेचा तुझा बाज नाही
स्मशानात गर्दी तरी तू विटेवर
म्हणू मी कसा रे! तुला लाज नाही
किती वादळे! भोवताली त्सुनामी
तुझी मी प्रभू ऐकली गाज नाही
चला सावडा प्रेत अपापुले या!
भुकेचा गिधाडास अंदाज नाही
असो देव माणूस अथवा फरिश्ता !
कुणी भेटलेला घरंदाज नाही
पुरे भक्तिमार्गात निष्काम जगणे
तिथे रात्र कायम नि रविराज नाही
नका चित्र रेखू कसा काल होतो
आत राहिला कालचा माज नाही
हिवाळा, उन्हाळा, असो पावसाळा
जिथे आसवांचा कधी साज नाही
करोनात " निशिकांत" ने भोगले जे
उसास्यास त्या मुक्त आवाज नाही
कुणी काल होते कुणी आज नाही
नियंत्या! दयेचा तुझा बाज नाही
स्मशानात गर्दी तरी तू विटेवर
म्हणू मी कसा रे! तुला लाज नाही
किती वादळे! भोवताली त्सुनामी
तुझी मी प्रभू ऐकली गाज नाही
चला सावडा प्रेत अपापुले या!
भुकेचा गिधाडास अंदाज नाही
असो देव माणूस अथवा फरिश्ता !
कुणी भेटलेला घरंदाज नाही
पुरे भक्तिमार्गात निष्काम जगणे
तिथे रात्र कायम नि रविराज नाही
नका चित्र रेखू कसा काल होतो
आत राहिला कालचा माज नाही
हिवाळा, उन्हाळा, असो पावसाळा
जिथे आसवांचा कधी साज नाही
करोनात " निशिकांत" ने भोगले जे
उसास्यास त्या मुक्त आवाज नाही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--भुजंगप्रयात
लगावली--लगागा X ४
No comments:
Post a Comment