एकटा गर्दीत जगलो ना कुणी मज गवसले
चोन्च उघडी पण कुणीही घास नाही भरवले
श्रावणाच्या पवसाने उजळली हिरवळ किती
आसवानी गत उन्हाळी एकलेपण सजवले
पाय मम रक्ताळलेले हे जणू झाले कमी
आठवानी गत क्षणाच्या कन्टकी मज फिरवले
शोध घेण्या जीवनाचा मी निघालो तुज सवे
तुज विना पासून माझ्या मीच मजला हरवले
सावकारी मी न केली कर्ज ना दिधले तरी
भेटता नजरेस नजरा तोन्ड का तू फिरवले?
गोफ मी गुम्फीत असता घातल्या गाठी किती?
कैद त्या गाठीत केव्हा जाहलो ना उमगले
मी दिली ताकीद मजला चेहरा हसरा हवा
वाळवन्टी मम मनाच्या आसवाना जिरवले
आप्त धोकेबाज झाले काय नवखे त्य मधे?
स्वप्न जे माझेच होते आज त्याने फसवले
मी आता बेबन्द झालो पाश सारे तोडले
वाकुल्या दावून विश्वा मीच होते खिजवले
माळ तुळशीची गळा मी घातली होती कधी
अन तरीही वाममार्गी पाय माझे बहकले
का तुझ्या" निशिकान्त" गजला जाहल्या दु:खी अशा?
दु:ख ह्रदयी लपविण्याचे तूच होते ठरवले
निशिकान्त देशपान्डे
प्रतिसादाची प्रतिक्षा 98907 99023
e mail nishides1944@yahoo.com
http://nsd-marathigazals.blogspot.com/
No comments:
Post a Comment